Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

राधेकृष्ण!

रात्रीचा दुसरा प्रहर झाला, शेजारी झोपलेल्या अनयाच्या अंगावर लख्ख चंद्रप्रकाश पडला होता.पण तो वळलेला.एवढ्यातच त्या कुशीवर वळलेला तिचा अनय! हक्काचा,जगाला ओरडून सांगता येईल असा तिचा अनय! त्याच्या मनात कुठे तरी गाठ बसलेली.त्यानं आजवर तिला शब्दांनी कधी बोलून दाखवलं न्हवत.पण त्याच्या कुठल्याही कृतीत आजकाल ती न्हवती. तिच्यातल्या बायकोनं त्याच्या केसांवरून हात फिरवला.रुसून झोपलेल्या त्याच्या शांतचेहऱ्याकडे बघून तिचे डोळे गच्च भरले.चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात तिला पटकन काही जाणवलं, ती उठली, उठण्याआधी पायातले जाड घुंगरू तिनं अलगद काढून ठेवलेआणि ती निघाली.भरधाव वेगानं!चंद्राच्या प्रकाशात चमकणारी यमुना बघुन तिचं मन भरून आलं. ती काठाशी पोहोचली.कृष्ण आणखी यायचा होता… राधा-कृष्ण! जगात असणाऱ्या विविध प्रेमांमध्ये सर्वोच्च आणि दुर्मिळ असणार अशारीरीक आत्म्याच प्रेम! त्याला कुठला स्पर्श न्हवता की कसली हाव न्हवती, कसली अपेक्षा न्हवती की कसली देवाणघेवाण न्हवती, त्याला न कोणत्या नात्याचा बंध होता ना कोणती भाषा होती. बरोबर आणि चूक यापलीकडल्या जगातली ती भावना, ते जग जिथे आत्म्याचा आत्म्याशी संवाद घडायचा. आणि ...

शब्दावाचून कळले सारे

“शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले” हेच वाटलं होतं जेंव्हा माधवाने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. लांबसडक रेशमी केसांची वेणी, त्यावर मोगरा-चाफ्याचा गजरा, सात्विकतेचं प्रमाण सांगणारे डोळे, संयमाची हद्द दाखवणारे नाजूक ओठ, सोज्वळतेचा अर्थ सांगणारा नक्षत्रासम चंद्रासारखा गौरवर्णी तेजस्वी चेहरा,त्या तेजाने आणखी उठून दिसणारे कानातले मोती!! चहाचा कप हाती देता हलका स्पर्श झाला,दोघेही प्रथम स्पर्शानी शहारून उठले.सगळे शब्द, सूर अवघडले होते, जेंव्हा तिने नाव विचारल्यावर मधाळ आवाजात “रमा!” म्हणून सांगितलं होते . “तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा” पसंद तर पाहताच पडली होती अन खरोखरीच पेशव्यां च्या रमा माधवासम भासणारी ही जोडी लग्नाच्या बोहल्यावर चढली होती…. “आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा तू अशी जवळी रहा” ह्याच ओळी डोक्यात घुमत होत्या जेंव्हा लग्नानंतर पहिल्यांदा तिच्याशी बायको म्हणून संवाद साधत हो ता. माधवाला पेटी वाजवत सुंदर गाणी गायचा भारी छंद! लग्नानंतर त्याला सगळ्यांनी हट्ट धरला गाणी गायचा.त्यानं तिच्यासाठी गायलेलं...

गाणं

  काही गाण्यांचा जन्मच मुळी एका गोष्टीसाठी झालेला असतो बहुदा…. सुरवातीच्या काही सेकंदातच ती कानामार्गे शिरून डोळ्यातून घळाघळा वाहायला लागतात.शब्द चालू ही झालेले नसतात, जरी झाले तरी एखादा शब्द घुसतो असा खसकन हृदयात आणि टचकन डोळ्यांचा रस्ता शोधतो, डोळे घट्ट मिटून तो रस्ता अडवायचा कितीही व्यर्थ आटापिटा केला तरी तो शब्द वाहून जातोच, कदाचित आणखीनच वेगाने...कारण त्या गाण्याचं कामच असतं, ह्रदय घुसळून त्यातल्या भावनांना डोळ्यांपर्यंत न्यायचं. हे असं भडाभडा मोकळं होणं बघून समोरचा गायक ही त्याच्या स्वरांना डोळ्यातून वाहू दिल्याबद्दल रसिकापुढे हात जोडतो.कदाचित ते स्वर, गाणं असं अश्रुंमध्ये रूपांतरित होऊन आणखी पवित्र होत असावं. पण तिथून निघणारा स्वर, हृदयात घेऊन,कुठल्याश्या आठवणींच्या बेटावर फिरून, एखादा शब्दाचा ह्रदयात घुसलेला बाण हळुवार काढून, शरीरावर तो स्वर काट्यांरूपी मिरवून, तेवढ्या वेळापूरता मेंदू शिथिल करून, काळ-वेळ-जागेच भान विसरून, डोळ्यांवाटे घळाघळा वाहू देऊन आपणच पवित्र होऊन जातो. प्रत्येकाच्या ह्रदयाचा कप्प्यात असं एखादं गाणं संग्रही असतंच.जे कुठून तरी वर आल्यासरशी जखमा उघडया करून...

तू “ती” आहेस!!

  जे तुला आजही कळालेलं नाहीये ते त्याला मनुष्यनिर्मितीच्या वेळीच कळालं होतं. ”तो” जन्माला आला आणि हे अद्भुत जग बघून अवाक झाला.ही सृष्टी सर्वप्रथम पाहिल्याच्या आनंदात तो चित्कार करणार इतक्यात त्याला “तू” दिसलीस, "आदिमाय!!" त्याला त्याच्या जन्माचं रहस्य उमगलं आणि एका झटक्यात त्याचा मद ओसरला.मरणयातना सहन करूनदेखील डोळ्यात प्रेम,माया आणि काळजीने बघणाऱ्या त्या सुंदर अन अगाध शक्तीला अर्थात ‘तिला’ पाहून त्याच्या मनात प्रचंड आदरभाव आणि भीती उत्पन्न झाली, नवनिर्माण असूनही त्याची शक्ती नवनिर्मिती केलेल्या तिच्यापुढे फिकी पडली.शरीरातून शरीर निर्माण करूनही ती तितकीच सशक्त,उत्स्फूर्त आणि तेजस्वी होती.त्याला ती जादू वाटली अन त्याच्या मनातल्या पुरुषी अहंकाराची धग पुरती विझली गेली. तो पुराणातही डोकावला.तिथेही तेच!जिथे देवांनी हात टेकले तिथे ती दुर्गेचं कधी कालीच रूप घेऊन आली अन तिनं समस्त सृष्टीला वरदान दिलं.हे बघूनही त्याला स्वतःचा दुबळेपणा मान्य करण्यात कमीपणा वाटू लागला.तिचं अप्रतिम लावण्य, तिच्यातली प्रचंड ऊर्जा,तिचं तेज, तिचं सामर्थ्य, तिची सहनशक्ती, तिचं पावित्र्य,तिचं देवत्व, तिचं सौष...

खरं सांगू??

खरं सांगू, थांबवलंय मी आजकाल लोकांमध्ये मिसळणं, भरभरून बोलणं। खोट्या चेहऱ्यांशी मनापासून माझ्या आत्म्याला जोडणं।। नाही रमत आजकाल मन गोंगाटात अन जमावात । या काळजातून उठलेल्या भावना बसताना दिसत नाहीत खोल आत।। जमत नाही आजकाल खोटं हसणं अन खोटी स्तुती करणं। ह्रदय तसं आजही सरळच आहे पण मीच चालू केलय त्याला अडवणं।। आजकाल नाहीच होत मला कुणालाही आपलंसं करून घेणं। थांबवलंय मी कोरड्या नात्यामध्ये मायेचं रक्त मिसळवण।। नका विश्वास ठेवू बरं तुमच्यात बसले, हसले जरी। जीव लावायचे नाही आता तुम्ही प्रेमाचा वर्षाव केला तरी।। गरज नाही आता तुमच्या सावलीची जरी आला पाऊस अथवा चटक्याचं ऊन। सवय झालीये आता एकटीनं सुखात नाचून अन एकटीनं दुःखात रडून।। बदललेली नाहीये बदलवलेली आहे रडणारी नाहीये थाठ्यात उभारलेली आहे। बसणारी नाहीये चढणारी आहे हवीशी वाटणारी नाहीये हेवा वाटणारी आहे।। खरं सांगू थांबवलंय मी आजकाल कशालाही महत्व देणं। जेव्हापासून चालू झालंय एकांतातल्या आत्म्याशी हितगुज करणं।। -प्र.ज्ञा.जोशी.

केंव्हा तरी पहाटे

  भल्या पहाटे गार वाऱ्याची झुळूक आली. त्या वाऱ्यासोबत तुझ्या केसांचा सुगंध… काल रात्री मी आणलेल्या गजऱ्याच्या कळ्यांचा अजूनही हवेत असलेला दर्प जाणवला. झटकन कुशीवरून वळलो.तू गाढ झोपलेलीस. पुन्हा तोच निरागस चेहरा, तेच टपोरे शांत डोळे , तेच गुलाबाच्या पाकळीसम दुमडलेले गुलाबी ओठ, पुन्हा माझं मानेखाली हात घेऊन तुला बघत बसणं, तुझ्या चेहऱ्यावर खिडकीतून येणारा चांदण्याचा प्रकाश हातानी अडवण आणि पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडणं. कितीदा अन कसा कसा तुझ्या प्रेमात पडावं मला खरंच कळत नाही बघ... त्या नाजूक गोऱ्यापान हातांमध्ये मी माझा हात गुंफला तर झटकन वळलीस आणि माझ्या कुशीत शिरून झोपलीस. अगदी लहान मुलासारखी…… मला जर कुणी विचारलं न की जगातला सगळ्यात आनंदी क्षण कोणता? तर मी क्षणार्धात उत्तर देईन! "गाढ झोपलेल्या तुझ्या केसांवरून हात फिरवत फिरवत तुला कुशीत घेऊन झोपणं"! का कुणास ठाऊक तुझ्या आवडत्या गाण्याच्या दोन ओळी गुणगुणाव्याश्या वाटल्या. “केंव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे,हरवून रात्र गेली…..” किती नशीबवान आहे ग मी,आत्ता या क्षणी स्वर्गसुख म्हणजे काय ते कळतंय मला. माझ्या ...